तुटलेली विद्युत् तार दुरुस्ती करण्याच्या विनंतीकडे ‘महावितरण’च्या अधिकार्यांनी केले दुर्लक्ष !

केडगाव (जिल्हा पुणे) – दौंड तालुक्यातील केडगाव येथे २२ जूनला घडलेल्या दुर्दैवी घटनेत यश जगताप या २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृत युवकाच्या कुटुंबियांनी केला आहे. १५ दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या वादळी वार्यासह पावसामुळे जगताप यांच्या शेतामध्ये विद्युत् तार तुटून पडली होती. हे ग्रामस्थांसह जगताप कुटुंबियांनी वारंवार ‘महावितरण’च्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. संबंधित तार तातडीने दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली होती; मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर एका तरुणाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी किरण देशमुख यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या घटनेनंतर केडगाव परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी शेतातील अन् गावातील धोकादायक अवस्थेतील विद्युत् तारा, तसेच खांबांची तातडीने पडताळणी करून दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !
विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासण्यासमवेत तंत्रज्ञानातील पालट आत्मसात् करावेत ! – डॉ. पी.के. सिन्हा
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री