
पंढरपूर – पंढरपूर-सातारा महामार्गावर टेंपो विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर कार्तिकेयन एस्. यांनी संबंधित अधिकार्यांसह अपघात प्रवण क्षेत्राची प्रत्यक्ष पहाणी केली. सातारा महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गालगतच्या अपघातप्रवण ठिकाणी तात्काळ सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस्. यांनी ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ला दिल्या, तसेच तांदुळवाडी परिसरातील धोकादायक विहिरींना संरक्षक कठडे उभारण्याचे काम तातडीने चालू करण्याच्या सूचनाही दिल्या.
या वेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चे उपअभियंता पी.एस्. राऊत, तसेच अन्य अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पहाणीच्या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, तांदुळवाडी हद्दीत महामार्गालगत ३ धोकादायक विहिरी असून त्यांना संरक्षक भिंती आणि कठडे उभारण्याची आवश्यकता आहे, तसेच या परिसरातील अपघातांची कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
‘नाईक मराठा मंडळ मुंबई’च्या शताब्दी वर्षानिमित्त ‘कृतज्ञ आम्ही, कृतार्थ आम्ही’ कार्यक्रम साजरा !
सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रविष्ट ! – राजेंद्र शेळके, मंदिरे सिमती
महाराणा प्रताप यांचा आदर्श समोर ठेवून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २३.०६.२०२६)
तुळजापूर येथे निष्क्रीय पोलीस प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण !
ठाकरे गटाच्या ६ खासदारांचा शिवसेनेत प्रवेश !