
तुळजापूर – श्री तुळजाभवानी मातेचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात वाढती गुन्हेगारी, चोरी, लूटमार आणि अवैध धंद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच्या निषेधार्थ जनहित संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण चालू केले आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार शहरात भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि पोलीस उपाधीक्षक नीलेश देशमुख हे कर्तव्यात निष्क्रीय ठरल्याचा आरोप करत त्यांचे तात्काळ स्थानांतर करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ‘जोपर्यंत निष्क्रीय अधिकार्यांवर कारवाई होत नाही आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील’, अशी चेतावणी देण्यात आली आहे. या साखळी उपोषणाला नागरिक आणि व्यापारी वर्गातूनही पाठिंबा मिळत आहे.
संपादकीय : ‘तेज’स कि मागास ?
‘नाईक मराठा मंडळ मुंबई’च्या शताब्दी वर्षानिमित्त ‘कृतज्ञ आम्ही, कृतार्थ आम्ही’ कार्यक्रम साजरा !
सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रविष्ट ! – राजेंद्र शेळके, मंदिरे सिमती
महाराणा प्रताप यांचा आदर्श समोर ठेवून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती
पंढरपूर-सातारा महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा ! – कार्तिकेयन एस्. जिल्हाधिकारी, सोलापूर
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २३.०६.२०२६)