गोव्यात समान नागरी कायद्याला गेल्या ६० वर्षांत कुणाकडूनही विरोध नाही ! – मुख्यमंत्री 

काँग्रेस असो वा समाजवादी पक्ष, ते स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण यांची मागणी करत नाहीत. जर विरोधी पक्षाला या दोन्ही गोष्टी देशात लागू करायच्या असतील, तर त्यांनी समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यावा.

देहली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन हिंदु मुलगी पिराचा दर्गा, वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे मुसलमानाकडे सापडली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लव्ह जिहाद ! देहली येथील ही अल्पवयीन हिंदु मुलगी स्वत:च्या घरी कुणालाही न सांगता तिचा वेंगुर्ला येथील ‘इंस्टाग्राम’वरील मित्र जावेद मकानदार याच्याकडे आली होती.

१५ जुलैपर्यंत ५ सहस्र युवक थेट सरकारी विभागांमध्ये शिकाऊ (अप्रेंटिस) म्हणून सहभागी होतील ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘‘प्रत्येक पंचसदस्य, सरपंच आणि नगरसेवक यांचे युवकांची ‘नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) पोर्टल’वर नोंदणी करून घेणे, हे ध्येय असले पाहिजे. या योजनेअंतर्गत वर्षभरात ‘शिका आणि कमवा’ ही योजना कार्यवाहीत आणली जाईल.’’

धर्मांतरविरोधी आणि गोहत्याबंदी कायदे रहित केल्यास रस्त्यावर उतरू !

पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.

पुणे येथील चांदणी चौकातील पुलाच्या कामामुळे ३ घंटे वाहतूक बंद !

चांदणी चौकातील पुलाच्या ‘गर्डर’ (संरक्षक भिंत) उभारणीचे काम चालू होणार आहे. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गांवरील पुणे येथील ‘चांदणी चौक’ मुख्य रस्त्यावरील वाहतूक प्रतिदिन मध्यरात्री १२ ते ३.३० पर्यंत बंद राहील.

नंदुरबार येथे वादळाने जिल्हा परिषदेच्या ४४ शाळांची हानी !

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍या संबंधितांवर कारवाई करायला हवी !

मसगा महाविद्यालयात इस्लामचा प्रचार केल्याप्रकरणी प्रा. अनिस कुट्टींसह ३ आरोपी !

अनुमती न घेता हा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी मसगा महाविद्यालयाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांना निलंबित केले होते. या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी १५ जणांवर जातीय तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

जळगावच्या वसतीगृहाच्या महिला गृहपाल सुट्टीवर गेल्याने पुरुष शिपायाकडे दायित्व !

महिला वसतीगृहात पुरुष कर्मचार्‍यांना बंदीचा आदेश असतांनाही त्याकडे कानाडोळा करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !

लोणावळा येथील भुशी धरण दुथडी भरून वाहू लागले !

शहरात २४ घंट्यात १५८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तसेच येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ३० जूनला रात्री १० वाजता ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. मागील काही दिवसांपासून सलग पडणार्‍या पावसामुळे येथील डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत.

भ्रष्टाचाराचा आरोप करत ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर मोर्चा !

महागनरपालिकेच्या कारभारामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै या दिवशी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.