हिंदु राष्ट्र स्थापनेची आत्मज्योत प्रत्येकाच्या हृदयात जागृत करूया ! – निरंजन चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

धर्म हा राष्ट्राचा पाया असून तोच सर्वश्रेष्ठ आहे. धर्मावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. देवतांचे होणारे विडंबन आणि देव-देश-धर्म यांची होणारी हानी रोखण्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करायला पाहिजेत.

कोल्हापूर येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभ्यंगस्नान

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे दीपावली पाडव्याच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभ्यंगस्नान घालण्यात आले.

कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासून भाविक रांगेत

तब्बल ८ मासांनी मंदिरे उघडल्याचा अपार उत्साह भाविकांमध्ये दिसून येत आहे.

‘स्टँड अप कॉमेडियन’ कुणाल कामरावर प्रविष्ट केलेल्या खटल्यातून देशातील सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना एक कडक संदेश आणि चपराक ! – हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता सत्येंद्र मुळे

कुणाल कामराच्या खटल्यातून आपल्या देशातील सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना एक कडक संदेश आणि चपराक जाईल याचा प्रयत्न आहे. अशा सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना मला हेच सांगायचे की, जाणूनबुजून कोणाचा अपमान करणे योग्य नाही.

मुंबईत दिवाळीत गेल्या १७ वर्षांतील सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण

या वर्षीच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुंबईमध्ये सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण झाल्याची नोंद ‘आवाज’ फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गेल्या १७ वर्षांतील सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण झाले आहे.

हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बहिरेवाडी येथील सैनिक ऋषिकेश जोंधळे (वय २० वर्षे) हे ४ दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर येथे हुतात्मा झाले. यानंतर १६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६.४० वाजता ऋषिकेश यांचे पार्थिव गावात आणण्यात आले.

मुंबईत फटाकेबंदी कागदावरच

दीपावलीच्या दिवसात मुंबईमध्ये पहाटेपर्यंत फटाके फोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी फटाकेबंदी केवळ कागदावरच राहिली. गेल्या ४ वर्षांचा आढावा घेता तुलनेने ध्वनीप्रदूषण अल्प असले, तरी आवाजी फटाके फोडू नयेत, या आवाहनाला नागरिकांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही

‘हिंदु धर्मात दोन लग्न करतात का ?’ – महिला तलाठी सय्यद, तारळे (जिल्हा सातारा)

प्रशासकीय कामात धर्म कुठून आला ? अर्ज स्वीकारून त्यावर योग्य उत्तर द्यायचे सोडून धर्मभावना दुखावणार्‍या या घटनेला कुणी ‘प्रशासकीय जिहाद’ म्हटल्यास चूक ते काय ? अशा प्रशासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

सोलापूर येथे वसुबारसच्या दिवशी ‘श्रीगुरुचरित्र’ या ग्रंथाचा पुनर्प्रकाशन सोहळा पार पडला

आपण जन्माला येतांना सुख, दुःख, गुण आणि दोष हेही समवेत घेऊन येतो; मात्र सद्गुरूंची सेवा करतांना आपण घेऊन आलेले दोष न्यून होतात आणि सद्गुण वाढतात. परमार्थाच्या सेवेमध्ये व्यक्तीचे परिवर्तन होणे ही सद्गुरूंची कृपाच असते.