
पणजी, २६ जून (वार्ता.) – सरकारने आधुनिकीकरण केलेल्या उसगाव येथील पशूवधगृहाच्या परिसरात ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर २८ जून ते १ जुलै या कालावधीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पशूवधगृह प्राणीहत्येसाठी सिद्ध करण्याच्या अनुषंगाने पशूवधगृहाच्या अधिकार्यांकडे चर्चा केलेली आहे, असे आदेशात म्हटले आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी या अनुषंगाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, ‘अखिल गोवा मुस्लिम जमात संघटना’ इतर राज्यांतून मोले आणि पोळे या तपासनाक्यांवरून ‘कुर्बानी’साठी पशूंची उसगाव येथील पशूवधगृहात वाहतूक करणार आहे. (कुर्बानीसाठी पशूंची वाहतूक करणारे अल्पवयीन आणि दुभते गोवंश, तसेच गायी आणत नाहीत ना ? याची तपासणी प्रशासन करणार कि नाही ? ‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ? – संपादक)
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी झुरळाला म्हटले विष्णूचा अवतार !
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित