आतंकवादविरोधी पथकाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश

मुंबई – मनसुख हिरेन यांच्या हत्येचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे हस्तांतरित करण्याचा आदेश ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने आतंकवादविरोधी पथकाला दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आतंकवादविरोधी पथकाला या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्याचा आदेश दिला होता; मात्र यानंतरही आतंकदविरोधी पथकाकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू होते. त्यामुळे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून न्यायालयाने आतंकवादविरोधी पथकाला वरील आदेश दिला. त्यामुळे आता मुकेश अंबानी यांच्या निवासाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या दोन्ही प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण आयोगाकडे सोपण्यात आले आहे.
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !