मुंबई – ज्या दिवशी पूजा चव्हाण यांचा मृत्यू झाला त्या दिवशी संजय राठोड यांच्या भ्रमणभाषवरून पूजा यांच्या भ्रमणभाषवर ४५ ‘मिस्ड कॉल’ करण्यात आले होते, असा दावा भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. हे फोन का करण्यात येत होते ? याविषयी पोलिसांनी अन्वेषण करून त्याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.
याविषयी चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी अन्य सक्षम पोलीस अधिकार्याची नियुक्ती करावी. पूजा चव्हाण मृत्यूचे अन्वेषण पुणे पोलिसांकडून काढून घेऊन एखाद्या सक्षम भारतीय सेवेतील अधिकार्याकडे द्यावे.’’
सौजन्य : Max Maharashtra
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !