Pakistani Embassy Celebrated Pahalgam Incident : पहलगाम आक्रमणानंतर नवी देहलीतील पाकिस्तानी दूतावासात कर्मचारी केक घेऊन जातांना आढळला !

नवी देहली – पहलगाम आक्रमणानंतर संपूर्ण भारतात शोक आणि संतापाचे वातावरण असतांना नवी देहलीतील पाकिस्तान दूतावासात एक कर्मचारी केक घेऊन जातांना दृष्टीस पडला. केक घेऊन जाणार्‍या या कर्मचार्‍याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जेव्हा पत्रकारांनी कर्मचार्‍याला केक आणण्याचे कारण विचारले, तेव्हा त्याने कोणतेही उत्तर दिले नाही.

पहलगाम आक्रमणानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी दूतावासातील कर्मचार्‍यांमध्ये कपात घोषित केली आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

यावरून पाकची मानसिकता उघड होते. अशा शत्रूदेशाचे कार्यालय आपल्या देशात असणे, ही त्याच्यासाठी कारवाया करण्याची आयती संधीच म्हणावी लागेल. शत्रूची अशी कार्यालये कायमची बंद करा !