Pahalgam Terror Attack : ‘कलमा’ म्हटल्याने हिंदु प्राध्यापकाला आतंकवाद्यांनी सोडले !

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमण

(कलमा म्हणजे अल्लाचा गौरव करणारी विधाने)

‘आसाम विद्यापिठा’चे प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या वेळी आतंकवाद्यांनी हिंदूंना त्यांची नावे विचारून, तसेच ‘कलमा’ म्हणण्यास सांगून ठार मारले. या आक्रमणाच्या वेळी तेथे असणारे आसाममधील ‘आसाम विद्यापिठा’चे प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांनी ‘कलमा’ म्हटल्याने त्यांना आतंकवाद्यांनी ठार मारले नाही.

भट्टाचार्य यांनी या घटनेविषयी सांगितले की, आम्ही एका झाडाखाली होतो, तेव्हा काही लोकांना ‘कलमा’ म्हणतांना ऐकले. मी लगेचच त्यांच्यासमवेत जाऊन बसलो. तितक्यात एक आतंकतवादी माझ्याजवळ आला आणि मला पाहून विचारले, ‘तू हे काय करत आहेस ?’ मी घाबरून जोरजोरात कलमा म्हणू लागलो. तेव्हा परत त्याने विचारले, ‘तू काय म्हणत आहेस ?’ मी केवळ ‘ला इलाहा इलाल्लाह..’ (अल्लाखेरीज कुणी देव नाही.) असे म्हणू लागलो. काही कारणास्तव तो तिथून निघून गेला. त्यांनी मला थेट कलमा म्हणण्यास सांगितले नव्हते; पण इतरांना तसे करतांना पाहून मीसुद्धा त्यांच्यासमवेत बसलो.

संपादकीय भूमिका

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी कलमा म्हणण्यास हिंदूंना भाग पाडले. तीच स्थिती संपूर्ण देशात आज ना उद्या येणार आहे. बंगालमध्ये हे लवकरच पहायला मिळणार आहे. ही स्थिती पहाता आता तरी देशातील निधर्मीवादी, सर्वधर्मसमभाववाले, धर्मनिरपेक्षतावादी आणि गांधीवादी हिंदू जागे होणार आहेत का ?, हा प्रश्नच आहे !