काश्मीरमध्ये अडकलेल्या ८३ नागरिकांना विशेष विमानाद्वारे महाराष्ट्रात आणणार

मुंबई – पहलगाम आक्रमणानंतर तेथे अडकून पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्यशासनाने विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. २४ एप्रिल या दिवशी श्रीनगर येथून मुंबईसाठी इंडिगोचे विशेष विमान पाठवण्यात येणार आहे. या विमानातून ८३ प्रवाशांना मुंबईत आणण्यात येईल. २५ एप्रिल या दिवशी उर्वरित पर्यटकांना आणण्यासाठी आणखी एका विमानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सूची सिद्ध करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे या सर्व साहाय्य कार्याची व्यवस्था पहात आहेत. पर्यटकांना आणण्यासाठी असलेल्या विशेष विमानांसाठी होणारा व्यय राज्यशासनाकडून करण्यात येणार आहे.