अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यांची न्यायालयात याचिकेद्वारे मागणी

मुंबई – वास्तूसजावटकार अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी मला अनधिकृत आणि सूडबुद्धीने अटक करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकार नसतांनाही केवळ माझी छळवणूक करण्याच्या उद्देशाने या प्रकरणाच्या पुनर्अन्वेषणाचा आदेश दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणा किंवा स्वतंत्र अन्वेषण यंत्रणा यांकडे सोपवावे, या मागणीची याचिका ‘रिपब्लिक टी.व्ही.’चे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी ३ डिसेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
वर्ष २०१८ मध्ये या प्रकरणी पोलिसांनी महानगर दंडाधिकार्यांकडे दिलेल्या अहवालामध्ये अन्वय नाईक आणि त्यांची आई यांच्या आत्महत्येचे अन्वेषण बंद करण्याची मागणी केली होती. मे २०२० मध्ये राज्यशासनाने या प्रकरणाचे पुन्हा अन्वेषण करण्याचा आदेश दिला होता. याविषयी अर्णव गोस्वामी यांनी ‘गृहविभागाच्या पुनर्अन्वेषणाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी याचिका करण्याची अनुमती मिळावी’, अशी विनंतीही न्यायालयाकडे केली आहे.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !