
रत्नागिरी – जिल्हा प्रशासन आणि अनेक स्वयंसेवी संघटनांचे संघटन असणार्या ‘हेल्पिंग हँड्स’च्या संयुक्त विद्यमानेे रत्नागिरी शहरातील नागरिकांना किराणा साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अनुमाने १६० दुकानदारांचे साहाय्य घेतले गेले आहे. जिल्हा प्रशासनाने ‘प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू’, असे ध्येय बाळगत ही व्यवस्था केली आहे.
‘नागरिकांनी घरपोच धान्य मिळण्याच्या सुविधेसाठी अत्यावश्यक मागणी नोंदवावी, घरात अनावश्यक धान्यसाठा करण्याचे टाळावे, तसेच या सुविधेसाठी लागणारे पैसे शक्यतो संकेतस्थळाद्वारे (‘ई-पेमेंट’द्वारे) भरावे’, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. अशाच प्रकारची घरपोच सेवा राजापूर, लांजा, मालंगुड, दापोली, पानवळ, निवळी, मंडणगड, गुहागर आदी ठिकाणीही चालू करण्यात आली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !