हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समजून घेणे आणि त्यास विरोध करणे हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भविष्‍यात व्‍यापारी, उद्यमी, नागरिक, समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी मोठा धोका उद्भवू शकतो. यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समजून घेणे आणि त्यास विरोध करणे, हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन श्री. रमेश शिंदे यांनी केले.

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर उपचारासाठी पुण्यात दाखल !

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी पुणे येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करा !

संबंधित महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल.

लव्ह जिहादच्या घटनेचा निषेध करण्यासाठी नागोठणे (जिल्हा रायगड) येथे आज बंद !

हिंदु जनजागृती मंच, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, जैन समाज आदींचा या बंदला पाठिंबा आहे. सकल हिंदु समाजाच्या वतीने हे बंदचे आवाहन लव्ह जिहाद, धर्मांतर आदींचा निषेध करण्यासाठी करण्यात आले आहे.

आंदोलन करतांना टाळ-मृदुंग घेत विरोधकांकडून विठ्ठल आणि वारकरी संप्रदाय यांचा अवमान !

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या भूमी घोटाळ्यावर अभंगाच्या स्वरूपात रचना करून तसे अभंग म्हणणे कितपत योग्य आहे ?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

आध्यात्मिक क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’ची स्थापना !

या सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देवता आणि संत यांना शिव्या देणारे कोणत्या तोंडाने मोर्चा काढतात ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मोर्चा तर ‘नॅनो’ झाला. विराट मोर्चा होईल, असे सांगितले होते. आझाद मैदान भरणारा मोर्चा असायला हवा होता; पण मोर्चा अपयशी ठरला, हे संख्येवरून दिसत आहे. त्यामुळे हा राजकीय मोर्चा होता.

वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठांकडून ठाणे बंद, फेरी काढून केला निषेध व्यक्त

शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी हिंदु देवता आणि संत यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ठाणे बंदची हाक दिली होती.

मुंबई भाजपकडून ‘माफी मागो’ आंदोलन !

‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी क्षमा मागावी’, ‘पाकिस्तान हाय हाय’ अशा घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी १७ डिसेंबर या दिवशी येथे ठिकठिकाणी रोष प्रकट करून निदर्शने केली.

वारकरी संप्रदायाकडून आज ‘ठाणे बंद’ची हाक !

वारकरी संप्रदायाकडून १७ डिसेंबर या दिवशी ‘ठाणे बंद’ची हाक दिली असून त्यास आमच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे’’, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.