राज्यसभेत गोंधळ घालणारे तृणमूल काँगेसचे ६ खासदार निलंबन

अशांकडून गोंधळामुळे वाया गेल्या कामकाजाचा खर्चही वसूल केला पाहिजे !

नवी देहली – राज्यसभेतील सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घातल्याच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांना निलंबित करण्यात आले. ४ ऑगस्टला सकाळी राज्यसभेचे कामकाज चालू झाल्यानंतर या खासदारांनी गोधळ घालण्यास चालू केल्यावर त्यांना निलंबित करण्यात आले. दोला सेन, नदिमुल हक, अबीर रंजन बिस्वास, शांता छेत्री, अर्पिता घोष आणि मौसम नूर अशी या खासदारांची नावे आहेत.