कोरोनाचा प्रभाव उणावूनही शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२ टक्के !

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार उणावला असला, तरी कोरोनाविषयीची भीती अल्प होत चालली आहे. परिणामी जिल्ह्यातील शाळा मोठ्या प्रमाणात चालू झाल्या आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२.४२ टक्के एवढीच आहे.

इयत्ता १२ ची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर इयत्ता १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

यावर्षी इयत्ता १२ वीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आहे. त्यामुळे यावर्षी परीक्षा विलंबानेे घेण्यात येणार आहेत.

सोलापूर येथील शाळकरी मुलांकडून १० दुचाकी वाहने जप्त

येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या ‘डीबी’ (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथकाने १२ वर्षांच्या शाळकरी मुलांकडून १० दुचाकी वाहने जप्त केली. ही मुले शहरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास होती.

उत्तरप्रदेशात १० वीच्या विद्यार्थ्याकडून वर्गातील बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून मित्राची गोळ्या झाडून हत्या

विद्यार्थ्यांना लहानपणापासून साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! याला स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांना साधना शिकवून धर्माचरण करण्यास सांगितले जाईल !

सांगली येथील मोकळ्या भूखंडावरील शैक्षणिक आरक्षण उठविण्याचे राज्यशासन आणि महापालिका प्रशासन यांचे कारस्थान ! – विजय नामजोशी

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान या संस्थेस सलग १३ वर्षे मालकी हक्क आणि ताबा असलेली विश्रामबाग येथील भूमी माध्यमिक शाळा म्हणून आरक्षित आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद रहाणार

देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट अन्य राज्यांतील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावरील माहिती आवेदनात ‘ब्राह्मण – ब्राह्मणेतर’ असा उल्लेख

शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावर शालेय विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येते. पूर्वी या माहिती आवेदनात सर्व जातींचा उल्लेख होता; परंतु आता त्या आवेदनात ‘ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मणेतर’ असा उल्लेख आढळला आहे.

शिक्षण खात्याने नाताळची सुटी १ जानेवारीपर्यंत वाढवली

शिक्षण खात्याने शाळांच्या नाताळच्या सुटीच्या कालावधीत पालट केला आहे. शाळांसाठी पूर्वी नाताळची सुटी २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी होती आणि आता १ जानेवारीपर्यंत असणार आहे. शिक्षण खात्याने हा निर्णय घोषित केला आहे.

पुणे येथे इयत्ता आठवीतील मुलीच्या भ्रमणभाषवर येतात अश्‍लील संदेश

मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गहन होत चालला आहे, यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते.

मनमानी करणार्‍या पुण्यातील खासगी शाळांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांचे आंदोलन !

शुल्क न भरणार्‍या विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ शिक्षण बंद करणार्‍या शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाई करावी यासाठी १० डिसेंबर या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत पालकांनी आंदोलन केले होते.