उत्तरप्रदेशात १० वीच्या विद्यार्थ्याकडून वर्गातील बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून मित्राची गोळ्या झाडून हत्या

विद्यार्थ्यांना लहानपणापासून साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! याला स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांना साधना शिकवून धर्माचरण करण्यास सांगितले जाईल !

प्रतिकात्मक चित्र

बुंदेलशहर (उत्तरप्रदेश) – येथील शिकरपूर शहरातील सरस्वती इंटर महाविद्यालयात १०वीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने वर्गात बैठक व्यवस्थेवरून झालेल्या वादातून वर्गमित्राची गोळ्या झाडून हत्या केली. आदल्या दिवशी झालेल्या वादातून त्याने दुसर्‍या दिवशी दप्तरातून वर्गात पिस्तुल आणून वर्गमित्रावर गोळ्या झाडून त्याला ठार केले. त्याला पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे. त्याने आणलेली पिस्तुल त्याच्या सैन्यात असणार्‍या काकाची होती. त्याचा काका सुट्टीनिमित्त घरी आला होता. ती पिस्तुल त्याने पाहिली आणि तो शाळेत घेऊन आला.