गुरूंची प्रीती साधकांवर सर्वकाळ असतेच !

साधकांच्या मनात काही वेळा ‘गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे) माझ्याकडे लक्ष नाही, त्यांची इतर साधकांवर प्रीती आहे; पण माझ्यावर नाही’, अशासारखे नकारात्मक विचार येतात. अशा साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.

धन्य ते परात्पर गुरु डॉ. आठवले आणि धन्य ते त्यांचे ‘साधकरूपी धन’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुप्राप्तीनंतर गुरुचरणी तन, मन आणि धन, म्हणजे सर्वस्वच समर्पित केले. त्यांच्याकडे शिल्लक राहिले ते केवळ ‘साधकरूपी धन’ !…

हिंदु राष्ट्र स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

सर्वांनीच या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा.

प.पू. भक्तराज महाराज यांचे लीलासामर्थ्य आणि त्यांचे शिष्य डॉ. जयंत आठवले यांचे द्रष्टेपण !

‘भविष्यात प.पू. बाबांच्या भजनांचे अर्थ सांगणारे कुणीतरी भेटतील’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१३ मध्येच ओळखले होते’, हे त्यांचे द्रष्टेपणच !

एकाच कुटुंबातील पाच जणांनी आध्यात्मिक ग्रंथलिखाण करणे – एक अद्वितीय घटना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील ते स्वतः धरून पाच जणांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर लिखाण केले आहे.

सनातनची आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

‘वेद, उपनिषदे, पुराणे आदी धर्मग्रंथ गेली सहस्रो वर्षे मार्गदर्शन करत आहेत, तसेच सनातनचे ग्रंथ पुढे सहस्रो वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करतील’, असा आशीर्वाद एका संतांनी दिला आहे.

करुणासागर आणि कृपासिंधू परात्पर गुरु डॉक्टर, आम्ही आपल्या चरणी शतशः कृतज्ञ आहोत !

साधकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे परात्पर गुरु डॉक्टरांसारखे दुसरे गुरु आज त्रिलोकांत तरी शोधून सापडतील का ? केवळ अशक्य ! यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अंतःकरणात पुन:पुन्हा हेच शब्द उमटतात, ‘चालविसी हाती धरोनिया ।’

आपत्काळात सर्व मानव जिवंत रहाण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी कृतीशील असणारे एकमेव द्रष्टे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

 ‘तिसर्‍या महायुद्धात एखादा देश जिंकावा किंवा एखाद्या देशाची हानी होऊ नये’, असा विचार माझ्या मनात येत नाही, तर ‘सात्त्विक व्यक्ती जिवंत राहाव्यात’, एवढाच विचार येतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हे हनुमंता, हिंदु राष्ट्र स्थापण्या दे आम्हा दास्यभाव अन् क्षात्रभाव यांचे वरदान !

रामचरणांच्या नित्य अनुसंधानात रहाणार्‍या महातेजस्वी हनुमंता, रामभक्ती आणि वीरवृत्ती यांच्या बळावर तू राक्षसांचा निःपात करून रामरायाचे धर्मसंस्थापनेचे ध्येय पूर्ण केले.

प्रतिदिन रामायण अनुभवण्यातील आनंद घ्या !

‘अंतःकरणात सतत रामाशी अनुसंधान ठेवणे (रामाचा, म्हणजे देवाचा नामजप किंवा भक्ती करणे), अर्थात् रामाला अनुभवणे’, हे अंतर्-रामायण. ‘रामाप्रमाणे धर्मसंस्थापना, म्हणजे ‘साधना’ म्हणून रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हे बाह्य-रामायण.