जुन्या दगडी पुलावरील खड्ड्यांविषयी महर्षि वाल्मीकि संघाकडून शासनाला साडी-चोळीचा अहेर !

‘खड्ड्यांविषयी असंवेदनशील असलेले प्रशासन काय कामाचे ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? संघटनांनी प्रशासनाला जाग येईपर्यंत पाठपुरावा चालू ठेवावा.

सांखळी-चोर्ला घाट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याच्या प्रकरणी २ अभियंते निलंबित

साखळी ते चोर्ला घाट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याच्या प्रकरणी शासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना सेवेतून निलंबित केले आहे, तसेच रस्त्याच्या कामाच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.

कुणकेरी-आंबेगाव रस्त्याचे काम १५ जानेवारीपर्यंत चालू करण्याच्या आश्‍वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन मागे

रस्त्याचे काम चालू करायचे होते, तर ग्रामस्थांवर आंदोलन करण्याची वेळ का आणली ? याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. ‘जनरेटा आल्याशिवाय काम कराचे नाही’, अशी मानसिकता प्रशासनाची झाली आहे, असे समजायचे का ?

कुडाळ-वेंगुर्ला रस्त्याच्या कामासाठी देहलीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाप्रमाणे रस्ताबंद आंदोलन करणार !

ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी प्रत्यक्ष, तसेच लेखी स्वरूपात वेळोवेळी मागणी केली; मात्र असंवेदनशील, निगरगट्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वेंगुर्ला-कुडाळ रस्ताबंद आंदोलन करण्यात येणार !

पाट ते पिंगुळी रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सांमत यांच्या वाहनांचा ताफा अडवला

पालकमंत्र्यांनी संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला अन् ‘येत्या १० दिवसांत रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला जाईल’, असे आश्‍वासन दिले.

२१ वर्षे दुर्लक्षित असलेल्या घोडमाळ (जिल्हा पालघर) येथील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी !

रस्ता कच्चा असल्यामुळे वाहनेसुद्धा गावात येण्यास त्रास होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर महिलांना, लहान मुलांना पुष्कळ त्रास होत आहे.

तुम्हाला रस्त्यांची दुर्दशा पाहून लाज वाटत नाही का ?

केरळमधील रस्त्यांच्या दुर्दशेवरून केरळ उच्च न्यायालयाने अधिकार्‍यांना फटकारले !
देखभाल करण्याचे ठाऊक नसेल, तर अभियंत्यांनी त्यागपत्र द्यावे ! – उच्च न्यायालय

डिसेंबरपर्यंत ४ तालुक्यांतील रस्ते खड्डेमुक्त करणार ! – बांधकाम विभागाचे मनसेला आश्वासन 

 प्रशासकीय अधिकारी कामांसाठी नागरिकांच्या आंदोलनाची वाट का पहातात ? आधीच नोंद घेऊन रस्ते दुरुस्त का करत नाहीत ?

दोडामार्गमधील रस्त्यांच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघाल्याने भाजपचे आंदोलन स्थगित

आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना चेतावणी देताना सांगितले की, ‘उपोषण स्थगित केले म्हणजे सुटलो, असा समज करून घेऊ नका. आमच्याकडे लोकशाहीने दिलेले अन्य मार्गही आहेत’, याची जाणीव ठेवा.

बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या कामासाठी आजपासून भाजपचे पुन्हा आंदोलन

बांदा-दोडामार्ग-आयी, तसेच दोडामार्ग ते वीजघर या मार्गांच्या दुरवस्थेविषयी प्रशासनाचे लक्ष वेधूनही आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात ८ नोव्हेंबरपासून जनआंदोलन आणि उपोषण करण्यात येईल, अशी चेतावणी दोडामार्ग भाजपच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.