ठाणे, ९ ऑगस्ट (वार्ता.) – भिवंडी-वाडा महामार्गावरील कामवारी नदीच्या पुलावरील एका खड्ड्यांत दुचाकी आदळून खाली पडली आणि मागून येणार्या ट्रकने धडक दिल्यामुळे अशोक काबाडी (वय ६५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. भिवंडी शहर आणि ग्रामीण भाग येथे खड्ड्यांमुळे आतापर्यंत ४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या घटनेप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संतप्त नागरिकांनी खड्ड्यांच्या दुरुस्तीची मागणी करत प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाची चेतावणी दिली आहे. गेल्या अनेक मासांपासून खड्ड्यांच्या दुरुस्तीविषयीचे निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे; मात्र ते दुरुस्त झालेले नाहीत. (नागरिकांचे मृत्यू होऊनही रस्ते दुरुस्त न होणे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > भिवंडी येथे खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू !
भिवंडी येथे खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू !
नूतन लेख
- सप्तश्रृंगी गडावर भेसळयुक्त बर्फीची विक्री करणार्या ५ दुकानदारांवर कारवाई !
- महिलेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद !
- मलठण (दौंड) येथे २९ गोवंशीय जनावरांचे प्राण वाचवण्यात गोरक्षकांना यश !
- छत्रपती संभाजीनगर येथे अल्पवयीन चोरटा गुन्हे शाखेच्या हातून निसटला !
- छत्रपती संभाजीनगर येथे ‘खटला मागे घे’ असे म्हणत अधिवक्त्याकडून महिलेचा विनयभंग !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पुणे येथे एका व्यक्तीकडून ३ लाखांहून अधिक रुपये जप्त !; पनवेल येथे वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण करणारे तिघे जण कह्यात !…