संमेलनातील परिसंवादांकडे पाठ फिरवणार्‍या दर्शकांचा नेते आणि कलावंत यांना पुष्‍कळ प्रतिसाद !

संमेलनामध्‍ये विविध विषयांवरील परिसंवाद आयोजित केले होते. याला १०० ते १५० लोक उपस्‍थित असल्‍याचे दिसत होते. दुसरीकडे चित्रपट कलावंत आणि राजकीय नेते यांच्‍या उपस्‍थितीला प्रचंड प्रतिसाद मिळत होता.

साहित्‍य संमेलनात वर्धा जिल्‍ह्यातील २३५ पुस्‍तकांचे प्रकाशन

वर्धा जिल्‍ह्यातील लेखक आणि साहित्‍यिक यांना न्‍याय देण्‍यासाठी येथील अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनामध्‍ये एक विशेष दालन उभारण्‍यात आले होते. या दालनामध्‍ये वर्धा जिल्‍ह्यातील विविध भागांतील ८४ लेखकांची २३५ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन मारामार्‍या होऊ नयेत; म्‍हणून वाचन केले पाहिजे ! – नागराज मंजुळे, दिग्‍दर्शक

गेल्‍या ६० वर्षांत पुष्‍कळ कविता-कादंबर्‍या झाल्‍या. त्‍यापेक्षा झाडे लावली, तर ते आपल्‍याला प्राणवायू देतात. वलयांकित माणसे आपल्‍याला अन्‍न-पाणी देत नाहीत. त्‍यामुळे झाडे जपली पाहिजेत, असे विधान अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्‍हटले. यावर चित्रपट दिग्‍दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रत्‍युत्तर दिले.

मराठी साहित्‍य संमेलनाची दिशा ?

आपण या समाजाचे देणे लागतो, ही जाणीव अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात असणे, हे जिवंतपणाचे लक्षण आहे; मात्र सध्‍याच्‍या संमेलनाच्‍या भव्‍यतेत महत्त्वाच्‍या गोष्‍टी विसरत आहोत, असे जाणवते.

दर्जेदार साहित्यासाठी साहित्यिकांच्या पुस्तकांविना पर्याय नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या नीतीमुळे सर्व उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान यांवर आधारित शिक्षण  हे मराठीत देता येणार आहे. ती ज्ञान भाषा आहे.

व्‍यासपिठावर साहित्‍यिक पुढे आणि राजकारणी मागे हवेत ! – कवी कुमार विश्‍वास यांचे परखड मत

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भाषणात अनेक ‘इंग्रजी’ शब्‍द वापरले. ‘सर्टिफिकेट’, ‘इंजिनिअरिंग’, ‘आयकॉनिक’, ‘लायब्ररी’, असे म्‍हणत मराठीचे महत्त्व त्‍यांनी सांगितले.

ग्रंथालय चळवळीला सरकारकडून आर्थिक साहाय्‍याची अपेक्षा ! – डॉ. गजानन कोटेवार, अध्‍यक्ष, राज्‍य ग्रंथालय संघ

साहित्‍य संमेलनामध्‍ये ग्रंथपालाला प्रतिष्‍ठा मिळाली नाही, अद्यापपर्यंत एकाही ग्रंथपालाला राज्‍य पुरस्‍कार मिळालेला नाही; कारण शासनकर्त्‍यांनी ग्रंथांविषयीची संवेदनशीलता गमावली आहे.

ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा हे महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ साहित्यिक ! – डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते

९६ वे अखिल भारतीय मराठी संमेलन वर्धा, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – आध्यात्मिक उंचीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ साहित्यिक म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा आहेत. त्यांनी मराठीला साहित्याचा अमर ठेवा दिला. अन्य साहित्य आज आहे; पण काही दशकांनी वाचलेही जाणार नाही. या तिघांचे साहित्य मात्र कायम वाचले जाईल. त्या अनुषंगाने आळंदी, देहू आणि वर्धा ही साहित्यिकांची … Read more

मराठी भाषेच्‍या समृद्धीसाठी राज्‍य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मराठी साहित्‍यकांनी मराठी माणसांचे मन समृद्ध केले. या सर्व प्रतिभावंतांचे मराठी माणसांवरील ऋण न फिटणारे आहे. साहित्‍य हा समाजाचा आरसा असतो. मातीचा गंध साहित्‍यिकांच्‍या लेखनातून दरवळत असतो. हा वारसा पुढे चालत राहिला पाहिजे.

वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनास ग्रंथदिंडीने प्रारंभ !

९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडी आणि मुलांनी केलेले ९६ वृक्षांचे रोपण यांनी करण्‍यात आले.