ऑस्ट्रेलियाचे जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू पॅट कमिन्स यांच्याकडून भारताला ३७ लाख रुपयांचे साहाय्य !

‘आयपीएल्’च्या माध्यमातून, तसेच एरव्हीही शेकडो कोटी रुपये कमावणार्‍या भारतीय क्रिकेट खेळांडूंनी असे साहाय्य घोषित केल्याचे ऐकिवात नाही.

 भारतातील कोविड चाचणी विश्‍वासार्ह नाही ! – ऑस्ट्रेलिया

 भारतात होणार्‍या कोरोना चाचणीत त्रुटी असावी अथवा विश्‍वास करण्याजोगी नसावी, असे पश्‍चिम ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर मार्क मॅक्गोवन यांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीसारख्या कठीण काळात आयपीएल् क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे अर्थहीन ! – ब्रिटनचे पत्रकार पिअर्स मॉर्गन

जे एका ब्रिटीश पत्रकाराला कळते, ते भारतातील सरकारी यंत्रणांना का कळत नाही ? देशातील एकही क्रिकेटपटू किंवा क्रीडाक्षेत्रातील व्यक्ती याविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या !

भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक ! – जागतिक आरोग्य संघटना

डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात पोलियो आणि क्षयरोग यांच्या विरोधात काम करत असलेले २ सहस्र ६०० तज्ञ कोरोनाविरोधात काम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक मार्गाने साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे.

जगात २० वर्षांत नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये कोरोना तिसर्‍या क्रमांकावर !

जगातील २१९ देशांत कोरोनाचा संसर्ग असून गेल्या १६ मासांत ३० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २ दशकांत नैसर्गिक आपत्तींत जेवढे एकूण बळी गेले, त्यापेक्षा अधिक मृत्यू कोरोनामुळे झाले असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील उद्योजकाच्या सहकार्याने सिंगापूरमधून ८ सहस्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ३ सहस्र ५०० व्हेन्टिलेटर भारतात आणणार !

आरोग्यव्यवस्था अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्व उद्योजकांचे अभिनंदन ! सद्यस्थितीत सिंगापूर येथून आणलेल्या आरोग्य सुविधा जनतेपर्यंत पोचण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आम्ही भारतीय आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार ! – अमेरिकेला उपरती

लवकरच आम्ही भारतातील नागरिक आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले आहे.

(म्हणे) ‘भारताची परिस्थिती वाईट असल्याने जगाने साहाय्य करावे !’

कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिचे नक्राश्रू ढाळत आवाहन !

(म्हणे) ‘कोरोनाच्या वाढत्या संसर्गापासून लक्ष वळवण्यासाठी भारत सीमेवर कुरापती काढू शकतो !’

भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा अपलाभ घेत चीनच सीमेवर कुरापत काढू शकतो, असेच भारतियांना वाटते; मात्र ‘आम्ही तसे नाही’, असे दाखवण्यासाठी आणि जगाची दिशाभूल करण्यासाठी चीन सरकारचे मुखपत्र अशा प्रकारचा कांगावा करत आहे !

भारतात मे मासाच्या मध्यापासून प्रतिदिन ५ सहस्र कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होऊ शकतो !

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापिठाच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ने तिच्या अभ्यासात भारतात कोरोनामुळे मे मासाच्या मध्यामध्ये प्रतिदिन ५ सहस्रांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.