|

लंडन (ब्रिटन) – भारतातील कोरोना रुग्णवाढीची भयानक परिस्थिती लक्षात घेता आयपीएल् क्रिकेट स्पर्धा तात्काळ रहित करून देशात कोरोना रोखण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. महामारीच्या काळात देशाचे संपूर्ण लक्ष हे विषाणू रोखण्याकडे असायला हवे. अशा कठीण काळात क्रिकेट स्पर्धा घेणे हे अर्थहीन आहे, अशी टीका ब्रिटनचे सुप्रसिद्ध टीव्ही पत्रकार पिअर्स मॉर्गन यांनी केली आहे. भारतात सध्या आयपीएल् क्रिकेट स्पर्धा चालू आहेत. ९ एप्रिल पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि ३० मे या दिवशी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे सामने सध्या देहली, कर्णावती, मुंबई आणि चेन्नई येथे होत आहेत. या पार्श्वभूमीवर मॉर्गन यांनी ही टीका केली आहे. आयपीएल् स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच चालू रहाणार असल्याचे ठाम मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याआधीच व्यक्त केले आहे.
The Indian Premier League should not continue given the horrific Covid crisis in India due to Prime Minister @narendramodi‘s woefully irresponsible leadership. The country’s sole focus should be on the raging pandemic. Cricket is irrelevant. #IPL
— Piers Morgan (@piersmorgan) April 26, 2021
भारतात सध्या दिवसाला ३ लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. कोरोनाची एवढी मोठी लाट आली असतांनाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतीही उपाययोजना करतांना दिसत नाहीत. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व दायित्वशून्यतेचे आहे, असेही ते म्हणाले.
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी