संतांनी वर्णिलेला शुभ दसरा !

अपराजितादेवीचे पूजन म्हणजे ‘विजयासाठी देवीकडे शक्ती मागणे’ आणि रात्री थोरामोठ्यांना शमीची पत्रे (पाने) देणे म्हणजे ‘आपल्या विजयाचे पत्र देऊन (विजयश्री प्राप्त करून) थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेणे’ होय. हिंदूंनो, विजिगीषु वृत्ती वाढवणारी ही विजयादशमीची तेजस्वी परंपरा आहे !

हिंदूंनो, शक्तीदायिनी विजयादशमी कशी साजरी कराल ?

शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर.

शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन !

या दिवशी राजे आणि सामंत, सरदार आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छता करून ती ओळीने मांडतात अन् त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात.

दसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देण्याची महती !

आपट्याची पाने आप आणि तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात. जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदान-प्रदान होते, तेव्हा हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात.

राजांच्या काळात साजरा होणारा विजयोत्सव !

राजांच्या काळात दसर्‍याच्या दिवशी हत्ती, घोडे यांना स्नान घालून त्यांच्यावर भरजरी वस्त्रे आणि अलंकार चढवून त्यांना राजवाड्यासमोर आणले जायचे.  सिंहासन पूजनानंतर राजे सीमोल्लंघनाला निघायचे. स्वस्तीवाचन व्हायचे. मिरवणुकीसमवेत रणवाद्येही असायची.

संत एकनाथ महाराजांनी सांगितलेली निजात्मपूजा (आत्मपूजा) आणि त्यादृष्टीने असणारे विजयादशमीचे माहात्म्य !

खर्‍या आत्मपूजेचे महत्त्व जाणून घेणे, हे विजयादशमीचे खर्‍या अर्थाने माहात्म्य !

हिंदूंच्या शस्त्रास्त्रांची दैवी आणि आध्यात्मिक परंपरा !

धनुष्यबाणामुळे प्रभु श्रीरामाची आठवण येते. श्रीराम कोदंडधारी (धनुर्धारी) आहेत.

गोंधळाची परंपरा !

‘श्रीविष्णूच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद-सुरांमध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदु धर्मात गोंधळाची परंपरा चालू झाली.

विजयादशमीचे रहस्य !

‘आश्विन शुक्ल दशमी हा दिवस सर्व भारतात ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतियांच्या मूर्तीमंत पराक्रमांचा इतिहासच ‘विजयादशमी’त दिसून येतो. हिंदु समाजातील चारही वर्णांच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे.