हिंदूंनो, शस्त्रे आणि शमी यांच्या पूजनामागील धार्मिक पार्श्वभूमी जाणा !
१२ वर्षांचा वनवास संपल्यानंतर पांडवांना १ वर्ष अज्ञातवासात काढायचे होते. त्यांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवली आणि वस्त्रे पालटून ते विराट राजाच्या दरबारी विविध रूपे घेऊन राहू लागले. अर्जुन ‘बृहन्नडा’ (नर्तकी) बनून नृत्यागारात राहू लागला. या कालावधीत अनेक संकटांचे त्यांनी कौशल्याने निवारण केले.