गोवा : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव विधवा भेदभाव प्रथा बंद करण्यावर खासगी ठराव मांडणार

हा ठराव मांडण्यापूर्वी युरी आलेमाव यांनी हिंदु धर्मशास्त्र जाणून घ्यावे, ही अपेक्षा ! हिंदु प्रथा-परंपरात हस्तक्षेप करणारे युरी आलेमांव मुसलमानांच्या हिजाब घालणे, बुरखा घालणे आदी प्रथांविषयीही आवाज उठवतील का ?

(म्हणे) ‘संतांचा अवमान करणार्‍यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही !’ – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अवमान करणारे विधान करूनही शिंदे सरकार त्यावर कारवाई का करत नाही ? संतांचा अवमान करणार्‍यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

संपाचे हत्‍यार !

वसंतदादा पाटील मुख्‍यमंत्री असतांना ५४ दिवस संप चालला. त्‍या वेळी त्यांनी ‘कर्मचार्‍यांची कुठलीही मागणी मान्‍य करणार नाही’, अशी कणखर भूमिका घेतली आणि संघटनेने संप बिनशर्त मागे घेतला. संपकर्ते स्‍वार्थासाठी जनतेला वेठीस धरत असतील, तर प्रसंगी शासनकर्त्‍यांनी कठोर भूमिका घेणे आवश्‍यक !

मध्‍यप्रदेशात सामूहिक बलात्‍कार आणि हत्‍येच्‍या घटनेनंतर आदिवासींचे पोलीस ठाण्‍यावर आक्रमण

मध्‍यप्रदेशातील महूमध्‍ये आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्‍कार करून तिची हत्‍या केल्‍याच्‍या घटनेनंतर आदिवासींनी पोलीस ठाण्‍यावर आक्रमण केले. या वेळी झालेल्‍या दगडफेकीत अनेक जण घायाळ झाले. बचावासाठी पोलिसांनी गोळीबार केला आणि अश्रुधुराच्‍या नळकांड्या फोडल्‍या.

उत्तर प्रदेश : चैत्र नवरात्रीला प्रत्येक जिल्ह्यात दुर्गा सप्तशतीचे पठण होणार !

उत्तरप्रदेश शासनाने सर्व जिल्ह्यांतील सर्व देवीची मंदिरे आणि शक्तीपीठे यांमध्ये चैत्र नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण अन् देवीचे जागरण आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासमवेतच अखंड रामायण पठणाचे आयोजन करण्यासही सांगितले आहे.

काँग्रेसने भारताला इस्लामी देश बनवले होते ! – भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी

कुंभपर्वामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. त्यात सहस्रो परकीय पर्यटक येतात. पण कुंभपर्वात सहभागी होणार्‍या कुणाला ‘हिंदु व्हा’, असे सांगितले जाते का ? ही उदारतेची आणि महानतेची सर्वोच्चता आहे.

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांना राजकीयदृष्ट्या संपवले, तर भारताची भरभराट होईल !’ – काँग्रेसचे नेते  सुखजिंदर सिंह रंधावा यांचा हास्यास्पद दावा !

जनतेने काँग्रेसलाच संपवण्याच्या स्थितीत आणल्यामुळे गेल्या ९ वर्षांत भारताची भरभराट होत आहे. काँग्रेस पूर्णपणे संपली की, देशाची प्रचंड भरभराटच होईल !

गड-दुर्गांवर मद्यपान केल्यास ३ मासांची शिक्षा !

या संदर्भात विधी आणि न्याय विभागाला संमतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्यातील गड-दुर्गांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याविषयीची लक्षवेधी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मांडली होती.

लंडनमधील राहुल गांधी यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ !

संसदेचे कामकाज गदारोळ न होता झाले, असा एकतरी दिवस गेला आहे का ? याला उत्तरदायी असणार्‍यांना ज्या प्रमाणे शाळेत वर्गातून बाहेर काढले जाते, तसे बाहेर का काढले जात नाही ?

भारताची अपकीर्ती करणार्‍या राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे !

”दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन यांच्यात आणि राहुल गांधी यांच्यात काय फरक आहे ? ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची भूमिका आणि आताची राहुल गांधी यांची भूमिका एकच आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत हे सिद्ध होते.”