चीन बनवत आहे ३०० नवीन ‘सायलो’ क्षेपणास्त्रे !

विस्तारवादी चीन त्याच्या अणवस्त्रशक्तीचा उपयोग भविष्यात भारताच्या विरोधात करील, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने आधीच सावध होऊन चीनला कूटनैतिक, व्यावसायिक आदी स्तरांवर च्युत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

भारताची वाढती शक्तीच हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थिरता स्थापित करू शकते ! – अमेरिका

भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! अमेरिका, युरोप आणि नोटो देश यांनी युक्रेनचा जो विश्‍वासघात केला, तसा ते भारताचाही करेल. यामुळे भारताने अशा ‘मित्रां’पासून सावध राहिले पाहिजे !

चीनच्या लडाखजवळील पायाभूत सुविधा धोकादायक ! – अमेरिकी अधिकार्‍याची चेतावणी

जे भारताने सांगायला हवे, ते अमेरिका सांगते ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

‘स्वतःचे प्रश्‍न हे सर्व जगाचे प्रश्‍न आहेत’, या मानसिकतेला युरोपने तिलांजली द्यावी !  

चीनशी भारताचे संबंध चांगले नसले, तरी भारत त्याचा सामना करण्यास सक्षम असल्याचाही स्पष्टोक्ती

चीनमध्ये बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने चालकाचा मृत्यू  

चीनच्या गुइझोऊ प्रांतात भूस्खलनामुळे बुलेट ट्रेनचे २ डबे रुळावरून घसरल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला, तर ७ प्रवासी घायाळ झाल्याची घटना ४ जून या दिवशी घडली.

‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या मुख्यालयाला चिनी राजदूताने दिली भेट !

वृत्तपत्राकडून चीनच्या विविध धोरणांचे नेहमीच समर्थन !

जगात फाशी देणार्‍या देशांच्या सूचीत चीन आघाडीवर ! – अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल

वर्ष २०२१ मध्ये जगभरात दिलेल्या एकूण फाशीच्या शिक्षांपैकी ८० टक्के फाशी इराण, इजिप्त आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये देण्यात आली आहे.

शेजारी देश समृद्ध व्हावेत, अशी चीनची इच्छा !

चीनने शेकडो कोटी रुपयांचे कर्ज देऊन श्रीलंकेचा घात केला. त्यामुळेच त्याचे आर्थिक कंबरडे मोडले. नेपाळ आणि पाकिस्तान ही त्याच मार्गाने जात असतांना अशी अविचारी अन् अपरिपक्व विधाने गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला इतिहासजमा करण्यासाठी पुरेशी आहेत !

चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करील ! – जो बायडेन  

चीनने  तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येथे ‘क्वाड’ देशांच्या बैठकीनंतर पत्रकारांच्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

चीनची मतपरिवर्तनाची रणनीती !

या माध्यमातून ‘चीन हा कसा चांगला देश आहे, चीनशी वाटाघाटी करा आणि चीनशी व्यापार करा, सीमाप्रश्नावर अधिक लक्ष देऊ नका, दोन्ही देशांतील व्यापार वाढणे, हे भारतासाठी हितकारक आहे’, असे चीनला भारतियांना सांगायचे आहे.