|

ब्रातिस्लावा (स्लोव्हाकिया) – ‘स्वतःचे प्रश्न हे सर्व जगाचे प्रश्न आहेत’, या मानसिकतेला युरोपने तिलांजली द्यावी; कारण जगाचे प्रश्न हे युरोपचे प्रश्न नाहीत, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी युरोपला फटकारले. ते युरोपमधील स्लोव्हाकिया देशाची राजधानी ब्रातिस्लावा येथे आयोजित ‘ग्लोबसेक २०२२’ परिषदेत बोलत होते.
भारतीय विदेश मंत्री एस जयशंकर ने यूरोप को आईना दिखाया #India #SJaishankar https://t.co/jXBijWvu1I
— AajTak (@aajtak) June 4, 2022
१. जयशंकर चीनविषयी म्हणाले की, चीनशी भारताचे संबंध ताणलेले आहेत; परंतु भारत त्याचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. जर भारताला जागतिक समर्थन मिळाले, तर ते नक्कीच उपयुक्त ठरेल; पण ‘मी एका संघर्षांत उतरावे; कारण मला त्यातून अन्य संघर्षांत साहाय्य होईल’, या समजुतीवर जग चालत नाही, असेही त्यांनी युरोपला सुनावले.
२. जयशंकर पुढे म्हणाले की, युक्रेनवरील आक्रमणावरून भारताने रशियावर टीका करावी, अशी युरोपातील काही देशांची अपेक्षा आहे. ‘भारताला चीनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी जगाच्या साहाय्याची आवश्यकता भासू शकते’, असा त्या देशांचा तर्क आहे; परंतु भारताचे चीनशी संबधित अनेक प्रश्न आहेत; परंतु त्याचा युक्रेन किंवा रशिया यांच्याशी काडीचाही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !