बीड येथे २५१ किलो वजनाच्या फुलांच्या हाराने छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वागत !

छत्रपती संभाजी राजे यांचे २५१ किलो वजनाच्या फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे हा हार उचलण्यासाठी जेसीबीचे साहाय्य घेण्यात आले होते, तसेच या वेळी १५० किलो वजनाच्या फुलांची उधळणही करण्यात आली.

नवी मुंबईत भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक आक्रमण

भाजप नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर दोन जणांनी प्राणघातक आक्रमण केले आहे. कोपरखैरणे सेक्टर ६ मधील कार्यालयात घुसून रिव्हॉल्वर आणि कोयता यांद्वारे आरोपींनी आक्रमण केले.

ऑक्सिजनअभावी ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा आरोप !

ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप मनसेकडून करण्यात आला आहे, तर ऑक्सिजन संपत आल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून तजवीज करण्यात आली नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांनी अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली ! – चंद्रकांत पाटील, भाजप

रिक्शाचालक प्रत्येक मासात १० सहस्र रुपये कमवतात आणि त्यांना केवळ दीड सहस्र रुपये देऊन त्यांच्याही तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ निर्बंध लादायचे आणि फारसे साहाय्यही करायचे नाही, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.’’

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारविरोधात व्यक्त केला असंतोष !

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच राज्याची कोरोनाविषयक स्थिती यांविषयी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांशी चर्चा केली.

रश्मी शुक्ला भाजपच्या दलाल असून त्यांनी अनुमतीविना फोन ‘टॅप’केले ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक विकासमंत्री

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत गुप्तचर विभागाच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या स्थानांतरामध्ये रॅकेट असल्याची माहिती पोलीस महासंचालकांद्वारे मुख्यमंत्र्यांना दिली होती…..

आघाडी सरकारला फार काळ दबावाचे राजकारण करता येणार नाही ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मोगलाईचे राज्य चालू आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर खटले प्रविष्ट करण्यात आले. अधिवेशन चालू असतांना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी येथे येणार्‍या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे.

विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांची नावे संमत न झाल्याने विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद

सभागृहात वाद घालणारे नकोत, तर वाद सोडवणारे लोकप्रतिनिधी हवेत !

विधीमंडळाच्या कामकाजाची नियमावली निश्‍चित करावी ! – सुधीर मुनगंटीवार, भाजप

या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘सत्ताधारी पक्षाने पत्रकार परिषदेत सर्व विधेयकांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले; मात्र एवढ्या अल्प वेळेत १० विधेयकांवर चर्चा कशी काय होणार ?

(म्हणे) ‘जर भाजप निवडणुकीत पराभूत झाला, तर तो ममता बॅनर्जींच्या हत्येचा कट रचू शकतो !’ – बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारचे मंत्री सुब्रत मुखर्जी

बंगालमध्ये सध्या भाजप कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या हत्यांविषयी मुखर्जी का बोलत नाहीत ? त्या कोण करत आहेत, याचा शोध त्यांचे सरकार का लावत नाही ?