सनातनचा बालसाधक कु. यशराज देशमुख पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात १३ वा

सनातनचा बालसाधक कु. यशराज सुर्यकांत देशमुख हा महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयात इयत्ता ५ वीमध्ये शिकत आहे. फेब्रुवारी मासामध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २८८ पैकी २६२ गुण मिळवून कु. यशराज याने राज्यात १३ वा क्रमांक मिळवला आहे.

(म्हणे) ‘राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडा !’ – रझा अकादमी

रझा अकादमीने राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे; मात्र राजभवनामध्ये कोणतीही मशीद नसल्याचे सूत्रांच्या हवाल्याने ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या वतीने समाजसेविका उज्ज्वला निकम यांचा नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन गौरव

कोरोना काळात रुग्णांना सकस आहार पुरवणार्‍या कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील अन्नपूर्णा सौ. उज्ज्वला लिनेश निकम यांना पुणे येथील ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या वतीने समाजसेविका उज्वला निकम यांचा नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

वीजदेयक भरणार नाही ! – कोल्हापूर कृती समितीची कोल्हापुरी चपलेच्या फलकाद्वारे चेतावणी

कोल्हापूर कृती समिती वाढीव वीजदेयकांच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात.

बत्तीस शिराळा येथे प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे !

शिराळा नगरपंचायतीने प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे ! पाळण्याचे ठरवले आहे.

व्यावसायिक वाहनांचा कर माफ करूनही त्यावरील दंडाच्या रकमेची मागणी

कर माफ झाला असेल, तर दंडाची वसुली कशासाठी ?

७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांची कोरोना पडताळणी पूर्ण करून टप्प्याटप्प्याने शाळा चालू करण्याचा निर्णय ! – जिल्हाधिकारी दौलत देसाई

२३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करणे बंधनकारक नाही.

(म्हणे) ‘धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद कोरोनापेक्षाही गंभीर !’  

हिंदु कट्टरतावादी असते, तर हा देश केव्हाच ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झाला असता, इस्लामी देशाप्रमाणे अल्पसंख्यांकांना हद्दपार केले असते, ते तसे नसल्यामुळे श्रीराममंदिर, श्रीकृष्णजन्मभूमी आणि ज्ञानवापी मशीद यांसाठी वैध मार्गाने लढा देत आहेत !

हसनपूर (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरातील श्री महाकालीदेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

हे मंदिर वर्ष १११३ मध्ये बांधण्यात आले आहे. ही घटना २० नोव्हेंबर या दिवशी उघड झाली, जेव्हा भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !