
पुणे – दळणवळण बंदीच्या कालावधीत व्यावसायिक वाहनांसाठी आकारण्यात येणारा कर माफ करावा, अशी मागणी वाहतूकदारांनी केली होती. दळणवळण बंदीच्या ६ मासांच्या कालावधीत करमाफीसाठी सरकारने ८०० कोटींची योजना दिल्याचे सांगितले आहे. त्यानुसार १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी करामध्ये शंभर टक्के माफी देण्यात आली आहे. त्यानुसार वार्षिक कर भरणार्या वाहनांसाठी ६ मासांच्या कालावधीसाठी करमाफीचा निर्णय घेण्यात आला; मात्र नव्याने कर येतांना त्यात करमाफीच्या कालावधीतील थकीत रकमेच्या दंडाचाही समावेश करण्यात आला आहे. करमाफी दिली असल्यास संबंधित कालावधीत रक्कम थकीत रहातच नाही. कर माफ झाला असेल, तर दंडाची वसुली कशासाठी ?, असा प्रश्न उपस्थित करून राज्यभरातील वाहतूकदारांकडून या अजब निर्णयाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण रक्कम माफ झाली, तरच वाहतूकदारांना खरा दिलासा मिळेल, अन्यथा ही योजना फसवी ठरेल. असे महाराष्ट्र राज्य माल प्रवासी वाहतूकदार महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !