गोव्यात दिवसभरात १०४ नवीन कोरोनाबाधित

गोव्यात सलग दुसरा दिवस कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. दिवसभरात १०४ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर १३० रुग्ण बरे झाले.

वाळपई येथील १० वी चा विद्यार्थी आणि कुजिरा, बांबोळी येथील शिक्षिका कोरोनाबाधित

कुडचडे येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील १२ वी इयत्तेतील विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याची घटना ताजी असतांनाच ११ डिसेंबर या दिवशी वाळपई येथील विद्यालयाचा १० वी इयत्तेतील एक विद्यार्थी आणि कुजिरा, बांबोळी येथील आणखी एक शिक्षिका कोरोनाबाधित आढळले आहेत.

राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘ड्रेस कोड’ लागू

‘ड्रेस कोड’ लागू केल्याविषयी सरकारचे अभिनंदन ! अर्थात सरकारने केवळ निर्देश घोषित न करता त्यांची नियमित कार्यवाही होण्याकडेही लक्ष द्यावे. या निर्णयाला विरोध झाल्यास तो मागे न घेता त्याचा अवलंब कसा होईल, हे सरकारने पहावे !

प्रसिद्धीलोलूप तृप्ती देसाई यांच्यावर कडक कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फलक काढण्यास गेलेल्या तृप्ती देसाईंना अटक करण्यात आली असली, तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या पादुकांचे आळंदीकडे प्रस्थान

आळंदी येथे होत असलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या पादुकांचे प्रस्थान करण्यात आले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनताफ्यावर आक्रमण झाल्याच्या प्रकरणी भाजप नेत्यांकडूून तृणमूल काँग्रेसचा निषेध

पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनताफ्यावर १० डिसेंबर या दिवशी दगडफेक करून आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात भाजपचे २ नेते घायाळ झाले होते.

राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान

डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापित होणार्‍या सर्व ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

शिर्डी येथे पदयात्रींनी पालख्या आणू नयेत ! – श्री साई संस्थानचे आवाहन

प्रतीवर्षी नियमित पालखी घेऊन येणार्‍या पदयात्रींनी यावर्षी पालखी आणू नये, असे आवाहन शिर्डी संस्थाननी केले.

ऊस वाहतूकदार टोळी मुकादमांवर गुन्हे नोंद करा ! – आमदार प्रकाश आबिटकर

मराठवाडा आणि विदर्भातील ऊस मजूर मुकादम यांच्याकडून जिल्ह्यातील ऊस वाहतुकदार मालकांची प्रतिवर्षी लाखो रुपयांची फसवणूक  होते. त्यामुळे या टोळी मुकादमांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली.

मुंबईत ‘नाइट क्लब’च्या मालकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास संचारबंदी ! -इक्बालसिंह चहल, आयुक्त, महापालिका

मौजमजा करण्याच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात नियम न पाळता एकत्रित आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल.