यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अपुर्‍या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची हानी ! 

वर्ष २०१८ मध्ये शहरातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले; मात्र ३० सप्टेंबर २०२० या दिवशी एकाच वेळी या महाविद्यालयातील ३८ शिक्षकांचे स्थानांतर करण्यात आले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्ग होणार भक्तीमार्ग ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल. यासाठी १२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

रस्ता सुरक्षेसाठी महिलांची विशेष दुचाकी फेरी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नवी मुंबई वाहन चालक-मालक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १३ फेब्रुवारी या दिवशी वाशी येथे रस्ता सुरक्षेसाठी महिलांची विशेष दुचाकीफेरी आयोजित केली होती.

रामभक्त रिंकू शर्मा यांच्या मारेकर्‍यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या !

रिंकू शर्मा यांच्या परिवारातील एका व्यक्तीस शासकीय चाकरी देण्यात यावी, या मागण्यांसाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने मिरज येथील उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन कार्यालयातील अधिकारी निडोनी यांनी स्वीकारले.

कोरोनामुळे यंदा पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्याची अनुमती रहित !

१९ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या शिवजयंती उत्सवासाठी शिवभक्तांना पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यास अनुमती रहित करण्यात आल्याचे नगराध्यक्ष रूपाली धडेल यांनी सांगितले.

‘टूलकिट’ प्रकरणी अधिवक्ता निकिता जेकब यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

भारतात कथित पर्यावरणवादी पर्यावरण वाचवण्याच्या नावाखाली देशविघातक कार्य करतात, हे दिसून येते. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

भोपाळ येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ला तोडफोड केल्याच्या प्रकरणी भाजपच्या माजी आमदारासह १७ जणांना अटक

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत त्यांनी येथील रेस्टॉरंट आणि हुक्का बार यांची तोडफोड केली होती.

शिवछत्रपतींचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी दुर्ग महासंघाची स्थापना करणार ! – छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार

शिवछत्रपतींचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी दुर्ग महासंघाची स्थापना  करण्यात येणार आहे. या माध्यमातून केंद्र आणि राज्य पुरातत्त्व खात्याशी दुर्ग संस्थांचे सामंजस्य करार करून गड-किल्ल्यांच्या संवर्धनाला हातभार लावला जाणार आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली.

(म्हणे) ‘जनता प्रत्युत्तर देणार !’- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी

देहलीतील आंदोलन देशातील ८० कोटी शेतकर्‍यांचे आहे. मात्र केंद्र सरकार हे आंदोलन मूठभर शेतकर्‍यांचे आणि दलालांचे असल्याचे सांगत आहे

शरद पवारांच्या निकटवर्तीयाला वाचवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली !

अधिवक्ता आणि पत्रकार नानासाहेब जाधव यांचा जनहित याचिकेद्वारे आरोप