कोरोनाची दुसरी लाट आल्यास सावरायलाही वेळ मिळणार नाही !

‘‘राज्यातील आरोग्य यंत्रणांवर आधीच पुष्कळ ताण आहे. आता लोकांच्या बेफिकिरीमुळे जर दुसरी लाट आल्यास केवळ रुग्णसंख्याच नव्हे, तर मृत्यूदरही वाढेल, अशी चिंता गंगाखेडकर यांनी व्यक्त केली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी मढ येथील मिथुन चक्रवर्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी प्रतिकूल परिस्थितीत सशस्त्र लढा उभारला ! – शरद फडके

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १३८ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना १७ फेब्रुवारी या दिवशी आदरांजली वहाण्यात आली.

देहलीच्या सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्याने पोलिसांवर तलवारी आक्रमण करत पळवली पोलिसांची गाडी !

आक्रमणात घायाळ झालेल्या पोलीस अधिकार्‍याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हरप्रीत सिंह असे आरोपीचे नाव असून घटनेनंतर थोड्या वेळाने पोलिसांनी त्याला अटक केली. 

३१ वर्षांनंतर उघडण्यात आले श्रीनगरमधील शीतलनाथ मंदिर !

जिहादी आतंकवादामुळे गेली ३१ वर्षे बंद असलेले येथील हब्बा कदल भागातील शीतलनाथ मंदिर वसंत पंचमीच्या दिवशी भाविकांसाठी उघडण्यात आले.

देहली हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य आरोपी मनिंदर सिंह याला अटक : २ तलवारी जप्त

गुन्ह्यांच्या प्रकरणी आरोपींना अटक झाल्यावर त्याचे खटले वर्षानुवर्षे चालत रहातात. या काळात आरोपी जामीनावरही सुटतो; मात्र त्याला शिक्षा होण्याची शक्यता अल्प रहाते. या घटनेतही तसेच होऊ नये !

गणेशोत्सवामध्ये जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती उपलब्ध करून द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर आयुक्तांना निवेदन

गेली अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याची अशास्त्रीय मोहीम शहरात राबवली जाते.

‘मानव सेवा संघा’च्या जिल्हाध्यक्षपदी दीपाली गोडसे

माजी उपनगराध्यक्षा आणि सातारा विकास आघाडीच्या नगरसेविका दीपाली गोडसे यांची ‘मानव सेवा संघा’च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपी निकिता जेकब हिला अंतरिम जामीन संमत

देहली येथील शेतकरी आंदोलनाचे ‘टूलकिट’ शेअर केल्याच्या प्रकरणातील आरोपी निकिता जेकब हिला मुंबई उच्च न्यायालयाने ३ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन संमत केला आहे.

वाई (जिल्हा सातारा) येथून २९ किलो गांजा शासनाधीन

वाई (जिल्हा सातारा) येथील नंदनवन वसाहतीमधील एका बंगल्यामध्ये गांजाची शेती केली जात होती. पोलिसांंनी या बंगल्यावर धाड टाकली. त्यांना तिथे २९ किलो गांजा आणि २ जर्मन नागरिक आढळून आले.