रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अधिवक्त्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र !
अनेक वेळा शासनाकडे लिखित मागणी करूनही पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूरकडे जाणारा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने येथील अधिवक्ता विजयकुमार नागटिळक यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र लिहिले आहे.