श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने पलूस येथे शोभायात्रा !

श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने श्री धोंडिराज मंदिर येथे ३० मार्चला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तसेच शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

पुणे येथील पेशवेकालीन तुळशीबागेत हनुमान जयंती सोहळा उत्साहात साजरा

श्रीराम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तीसमोर असलेल्या पाषाणातील उभ्या हनुमानाच्या मूर्तीला हनुमान जयंतीनिमित्त रेशमी वस्त्रे आणि दागिने घालण्यात आले होते. मंदिरावर आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एका दिवसाच्या खानपानासाठी ९७ सहस्र २२२ रुपयांची तरतूद !

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानात खानपानासाठी एका वर्षासाठी साडेतीन कोटी रुपये, तर उपमुख्यमंत्र्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानात खानपानासाठी एका वर्षासाठी दीड कोटी रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या तरतुदीला सरकारकडून मान्यता देण्यात आली.

मुंबईत ३ आतंकवादी शिरल्याचा मुंबई पोलिसांना दूरभाष !

दुबईवरून ७ एप्रिलला पहाटे ३ आतंकवादी मुंबईत शिरल्याची आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याची माहिती संपर्क करणार्‍याने दिली आहे.

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली !

अनधिकृत मजार निर्माण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांवर आणि ही अनधिकृत मजार निर्माण करणार्‍यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

मुली अत्यंत घाणेरडे कपडे घालून बाहेर पडत असल्याने त्या शूर्पणखा वाटतात ! – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय

माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. रस्त्यात घट्ट कपडे घातलेली एक तरुणी मद्यधुंद स्थितीत तमाशा करत होती. तिला शूर्पणखा नाही, तर काय म्हणावे ?

आसाममध्ये ‘पी.एफ्.आय.’ या  प्रतिबंधित संघटनेच्या ३ सदस्यांना अटक !

पी.एफ्.आय.वर केवळ बंदी घालणे पुरेसे नसून त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सुरक्षायंत्रणांना कसोशीने प्रयत्न करावे लागतील, हेच यातून दिसून येते !

सापळा रचून पकडलेल्या लाचखोर सरकारी अधिकार्‍यांना दोषी ठरवण्यात ‘एसीबी’ला अपयश !

लाच घेतलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना लाच घेतांना रंगेहात पकडलेले असते, तसेच त्यांच्याकडून लाचेची रक्कमही जप्त केली जाते. हे सर्व प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले असतांनाही दोषींना शिक्षा का होत नाही ? नक्की यामध्ये काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ३ आदिवासी महिलांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दंडवत प्रदक्षिणा घालायला भाग पाडले !

तृणमूल काँग्रेस किती खालच्या पातळीचे राजकारण करत आहे, हे यातून दिसून येते. असा पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक आहे !

राज्यातील १ सहस्र अवैध मजारींवर कारवाई करणार ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

जर एका राज्यात इतक्या अवैध मजारी असतील, तर संपूर्ण देशात किती असतील, याची कल्पना करता येत नाही  ! अशा सर्व अवैध मजारींवर कारवाई कधी होणार ?