महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरील रेष आहे. महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यावर समान नागरी कायदा लागू करू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. १ ऑक्टोबर या दिवशी मुंबई आणि नवी मुंबई येथे भाजपच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. या वेळी अमित शहा म्हणाले, ‘‘जे सरकार काम करते, ते जिंकते. त्यामुळे कोणत्याही सर्व्हेचा विचार न करता जोमाने कामाला लागा. या वर्षी महायुतीचे सरकार येईल. वर्ष २०२९ मध्ये महाराष्ट्रात एकट्या भाजपची सत्ता येईल.’’