सनातन परंपरेच्या माध्यमातून भारताला ‘विश्‍वगुरु’ बनवू ! – योगऋषी रामदेवबाबा

रामदेवबाबा यांनी मदरशावर राष्ट्रध्वज फडकावला

उत्तराखंडमधील जिम कार्बेट अभयारण्यात बांधल्या आहेत अवैध मजारी !

अशा मजारी बांधेपर्यंत प्रशासन आणि वनाधिकारी काय करत होते ? आणि आतातरी त्यावर कारवाई होणार का ? असे प्रश्‍न उपस्थित होतात ! राज्यातील भाजप सरकारने याची चौकशी करावी, असे हिंदूंना वाटते !

वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेऊनही कोरोना होणे, हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अपयश ! – योगऋषी रामदेवबाबा

वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेऊनही जर कोरोनाचा संसर्ग होत असेल, तर हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अपयश आहे, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. ते एका आंतरराष्ट्रीय संमेलनात बोलत होते.

बागेश्वर (उत्तराखंड) येथे अचानक रडू आणि किंचाळू लागले शाळेतील विद्यार्थी !

याची अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी न करता याच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे अशा त्रासांपासून रक्षण होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !

डेहराडून (उत्तराखंड) येथील एका शाळेला ‘शुक्रवारी’ अर्धा दिवसाची सुटी देण्याचा प्रयत्न पालकांनी हाणून पाडला !

असे जागृत पालक सर्वत्र हवेत ! उत्तराखंडमधील भाजप सरकारने अशा शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरोधात कारवाई केली पाहिजे !

हरिद्वार येथे कावड यात्रेच्या मार्गात नमाजपठण करणार्‍या ८ जणांना अटक !

एरव्ही काहीतरी कारण काढून हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांचा कावड यात्रेच्या कालावधीत आणि तेही हरिद्वारसारख्या तीर्थक्षेत्री दंगल घडवण्याचा हा प्रयत्न नसेल कशावरून ?

गोरक्षण करण्यासाठी बेरोजगारांना गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देणार !

उत्तराखंडमधील पुष्कर सिंह धामी शासनाचे अभिनंदन ! गोमाता सर्वार्थाने महत्त्वाची असल्याने अन्य भाजपशासित राज्यांनीही गायींचे रक्षण करण्यासाठी शासकीय स्तरावर अशी योजना राबवणे आवश्यक !

मंगलौर (हरिद्वार) या मुसलमानबहुल शहरातील पशूवधगृहांवरील बंदी न्यायालयाने बकरी ईदपुरती उठवली

न्यायालयाने ‘बकरी ईदच्या दिवशी जिल्ह्यातील मंगलौर शहरातील पशूवधगृहांवरील बंदी उठवण्यास आम्ही अनुमती देत आहोत. पशूंची हत्या ही केवळ पशूवधगृहातच करता येईल’, असे स्पष्ट केले.

केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यास अनुमती !

मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाविषयीचा निर्णय धर्माचार्यांनी आणि तेथील पुजार्‍यांनी घेणे अपेक्षित आहे. गर्भगृहाला वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. तेथील पावित्र्य जपणे आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय शासनकर्त्यांनी घेणे योग्य नाही !

हरिद्वार येथे चालत्या गाडीत आईसह तिच्या ६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा करणे, हाच अशा घटना रोखण्याचा उपाय आहे, हे सरकारला कधी कळणार ?