राष्ट्रवादी लोकांनी अराजक माजवू पहाणार्‍या लोकांवर अंकुश ठेवावा ! – महंत रामगिरी महाराज

  • महंत रामगिरी महाराज हे इस्लामचे प्रेषित महंमद पैगंबर यांच्याविषयी बोलल्याचे प्रकरण

  • समाजात तेढ निर्माण होण्यासारखे बोललो नसल्याचे प्रतिपादन

महंत रामगिरी महाराज

नाशिक – मी समाजात तेढ निर्माण होण्यासारखे काहीही बोललो नाही. माझ्या प्रवचनातील मोजकाच भाग ‘एडिट’ करून दाखवण्यात आला आहे. माझा राज्यघटना आणि न्यायव्यवस्था यांच्यावर विश्‍वास आहे. हिंदूंनी त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात संघटित व्हावे. राष्ट्रवादी लोकांनी अराजक माजवू पहाणार्‍या लोकांवर अंकुश ठेवावा. सर्व समाजांनी शांतता राखावी. आंदोलन किंवा दगडफेक करणे योग्य नाही. आम्ही शांतताप्रिय आहोत. अत्याचार सहन करू नये, हा आमचा उद्देश आहे, असे विधान महंत रामगिरी महाराज यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.