
१. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळातील सेवा भगवंतच करवून घेत असल्याचे अनुभवणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत सेवेची व्याप्ती पुष्कळ असते; पण त्या वेळी ‘भगवंताने सर्व सेवा करून घेतल्या’, असे प्रत्येक क्षणी मला अनुभवता आले.
२. सेवा करतांना व्यष्टी साधनेचेही प्रयत्न होऊन सर्वच साधकांना आनंद मिळणे
प्रसाद देण्याची सेवा करतांना माझा नामजप सतत होत होता. भावजागृतीचे प्रयत्न करणे, सेवा करतांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे इत्यादी प्रयत्न भगवंतच माझ्याकडून करून घेत होता. या कालावधीत कोणत्याच सेवेत अडचण आली नाही. सेवेत सहभागी असलेल्या अन्य साधकांनी देखील पुष्कळ साहाय्य केले. सर्वजण आनंदाने सेवा करत होते.
३. ‘भगवंतच सर्व सेवा नियोजनानुसार करून घेत आहे’, अशी अनुभूती येणे
या वर्षी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला जोडूनच गुरुपौर्णिमा महोत्सव आला होता. त्याचीही सेवा सलग चालू होती. ‘हे सर्व भगवंत करून घेत आहे’, असे माझ्या लक्षात येत होते. सेवांचे नियोजन केल्याप्रमाणे सर्व सेवा होत होत्या.
‘भगवंता, आमच्याकडून प्रत्येक क्षणी तुझी सेवा करून घे. आमच्यामध्ये कोणताच कर्तेपणा येऊ देऊ नकोस. भगवंता, मला तुझ्या सेवेत अखंड रहाता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.७.२०२३)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !