
मुंबई – कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना कारागृहातून नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १९ नोव्हेंबर या दिवशी ही कार्यवाही करण्यात आली.
आरोग्याच्या कारणास्तव कारागृहाऐवजी नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती. त्यानुसार त्यांची ही मागणी मान्य करत नजरकैदेत असेपर्यंत त्यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, तसेच त्यांच्या भ्रमणभाष वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सामाजिक संकेतस्थळाचा वापरही त्यांना करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !