
मुंबई – ३ दिवस मृत्यूशी झुंज देणारे ‘गोविंदा’ संदेश दळवी (वय २२ वर्षे) यांचा मृत्यू झाला. ते ‘शिवशंभो गोविंदा पथका’तील गोविंदा होते. दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्यावर ते ७ व्या थरावरून पडून घायाळ झाले होते. त्यांची मान आणि मेंदू यांना पुष्कळ दुखापत झाली होती. त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते; पण उपचारांच्या काळातच त्यांचा मृत्यू झाला. घायाळ झाल्यावर त्यांना कोणतेही सरकारी साहाय्य मिळाले नाही. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि भावंडे आहेत. विलेपार्ले (पूर्व) येथे वाल्मिकी चौकातील दहीहंडीचे आयोजन रियाज शेख यांनी केले होते; पण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी कोणतीही काळजी घेतली नाही, तसेच त्यांना कोणतीही साधनसामग्रीही पुरवली नाही. त्यामुळे दहीहंडी फोडतांना विनय रांबाडे (वय २० वर्षे), संदेश प्रकाश दळवी (वय २२ वर्षे) हे दोघेजण खाली पडून त्यांना गंभीर दुखापत झाली.
दहीहंडीत डोक्याला मार लागून २ गोविंदा गंभीर घायाळ झाल्याप्रकरणी आयोजकांवर विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. शासनाने घोषित केल्याप्रमाणे मृत गोविंदाच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देणार आहोत. आयोजकांनी नियमावलीचे पालन केले का ? याचीही चौकशी करू, असे क्रीडामंत्री गिरीश महाजन म्हणाले.
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’