
मुंबई – उदयपूर येथील कन्हैयालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. हिंदूंच्या नृशंस हत्या करणार्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुंबई जिल्हाधिकार्यांसह ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आणि अंबरनाथ तहसीलदार यांच्या माध्यमातून भारत सरकारला निवेदने दिली. मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उल्हासनगरचे नायब तहसीलदार गणपत शिंगाडे आणि अंबरनाथ तहसीलदार प्रशांती माने यांना निवेदने देण्यात आली.

‘केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत’, अशी मागणी केली. यांसह सरकारने मदरशांना निधी देणे बंद करावे, तसेच आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे त्वरित बंद करावेत, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !