
सोलापूर, १ मार्च (वार्ता.) – महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात विविध शहरांत आणि ग्रामीण भागांत ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शन कक्ष उभारण्यात आणि ग्रंथांचा प्रसार करण्यात धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांचा सक्रीय सहभाग होता.

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील श्री उत्तरेश्वर मंदिरासह अनेक शिव मंदिरांची स्वच्छताही करण्यात आली, तर काही मंदिरांमध्ये ध्वनीक्षेपकावर ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप लावण्यात आला होता.



महाशिवरात्रीचे शास्त्र समाजाला कळावे यासाठी ३८० हून अधिक ठिकाणी फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला, तर जिल्ह्यात १६७ हून अधिक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त प्रवचने घेण्यात आली. शहरांतील मुख्य ठिकाणी, तसेच मंदिरांमध्ये शिव पूजेविषयी शास्त्रोक्त माहिती असलेली भित्तीपत्रके मोठ्या प्रमाणात लावण्यात आली होती.

१. म्हसवड (जिल्हा सातारा) येथील सिद्धनाथ मंदिर, लासुर्णे (जिल्हा सातारा) येथील नंदिकेश्वर मंदिर येथे उपस्थित भाविकांसह हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.

२. परळी (जिल्हा बीड) येथील वैजनाथ मंदिर येथील ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंनी मोठ्या प्रमाणात भेट दिली. या वेळी अनेकांनी सनातन संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले, तसेच या प्रदर्शन कक्षावरील अध्यात्म आणि धर्माचरण याविषयीचे ग्रंथ जिज्ञासूंचे विशेष आकर्षण ठरले.
पू. चरणानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले !![]() चिंचगांव टेकडी, कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) येथील सत्संग आश्रमाचे प.पू. रामानंद सरस्वती महाराज यांचे उत्तराधिकारी पू. चरणानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी पू. चरणानंद सरस्वती महाराज यांना ‘हिंदु-राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट दिला. |

पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान