भगवान श्रीराम यांचे या ठिकाणी त्यापूर्वी शेकडो वर्षे मंदिर होते आणि ते पाडूनच मशीद बांधण्यात आली, हे न्यायालयात स्पष्ट झाले आहे, हे ओवैसी का लपवत आहेत ? हे त्यांनी सांगावे !

भाग्यनगर (तेलंगाणा) – अयोध्येत बाबरी मशीद ४०० वर्षे उभी होती, याची येणार्या पिढ्यांना आठवण करून द्यावी, असे आवाहन एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या समर्थकांना ट्वीट करून केले आहे.
Remember & teach the next generation to remember:
For 400+ years our #BabriMasjid stood in Ayodhya. Our ancestors prayed in its hall, broke their fasts together in its courtyard & when they died, they were buried in the adjoining graveyard
Never forget this injustice [1]
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 6, 2020
ओवैसी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आमच्या पूर्वजांनी तेथे एकत्रितपणे नमाजपठण केले होते. तेथे त्यांनी त्यांचे रोजेही सोडले होते. जेव्हा त्यांचा मृत्यू होत असे, तेव्हा त्यांना याच परिसरात दफन केले जात असे. ६ डिसेंबर १९९२ मध्ये संपूर्ण जगासमोर आमची मशीद ध्वस्त करण्यात आली होती. जे याला उत्तरदायी होते, त्यांना एका दिवसाची देखील शिक्षा मिळाली नाही.’ (ज्यांनी येथे असलेले मंदिर ५०० वर्षांपूर्वी पाडले, त्यांना शिक्षा मिळाली नव्हती, हे ओवैसी का सांगत नाहीत ? मंदिर पाडून मशीद बांधणारे ओवैसी यांचे कोण लागतात, हेही त्यांनी सांगावे ! – संपादक)
अयोध्येतील वाद संपल्याने आता ‘काळा’ किंवा ‘विजय’ दिवस पाळू नये ! – इक्बाल अन्सारी
अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिर आणि बाबरी ढाचा यांचा वाद न्यायालयाच्या आदेशानंतर संपुष्टात आल्याने आता कुणीही ६ डिसेंबर हा ‘काळा दिवस’ किंवा ‘विजय दिवस’ म्हणून पाळू नये, असे आवाहन बाबरीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांनी केले आहे. ‘आता मंदिर आणि मशीद दोघांचेही अयोध्येत बांधकाम होत आहे. त्यामुळे लोकांनी आता हा वाद विसरून विकासाची गोष्ट केली पाहिजे आणि दोन्ही धर्मियांनी एकत्र बंधूभावाने राहिले पाहिजे’, असेही ते म्हणाले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !