
मालवण – गणेशचतुर्थीच्या काळात कोकणात येणार्या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी माजी खासदार तथा भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
‘कोकणात गणेशचतुर्थीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो; मात्र कोरोनाच्या महामारीमुळे गणेशभक्तांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता रेल्वेचा प्रवास सुरक्षित वाटतो. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने विशेष रेल्वेगाड्या चालू कराव्यात’, असे या निवेदनात म्हटले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !