पुरी येथे १८ ऑगस्टला, तर मथुरा, वृंदावन आणि द्वारका येथे १९ ऑगस्टला श्रीकृष्णजन्माष्टमी साजरी होणार !
अखिल भारतीय विद्वत परिषद आणि काशी विद्वत परिषद यांचे म्हणणे आहे की, १८ ऑगस्टला अष्टमी तिथी सूर्योदयाच्या वेळी नाही, तर रात्री असणार आहे. त्याच वेळी १९ ऑगस्टला सूर्योदयाला अष्टमी तिथी चालू होऊन रात्रीही राहील.