उजनी धरणातून सोलापूरसाठी भीमानदीत सोडण्यात आले पाणी
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या स्रोतांपैकी एक असलेल्या औज बंधारा कोरडा पडला असून टाकळी बंधार्यात सध्या सोलापूर शहराला पुढील १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शेष आहे.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या स्रोतांपैकी एक असलेल्या औज बंधारा कोरडा पडला असून टाकळी बंधार्यात सध्या सोलापूर शहराला पुढील १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शेष आहे.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या पूर परिस्थितीचा अभ्यास करून मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पद्धतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
कोरोनाची तिसरी लाट आल्यास महापालिका प्रशासनाने लहान मुलांकरिता वाय.सी.एम्. रुग्णालयामध्ये १५० ऑक्सिजन बेड, ३० आयसीयू बेड आणि जिजामाता रुग्णालयात १५० खाटांची व्यवस्था केली आहे.
जिल्ह्यात कोरानामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) ची लक्षणे आढळत आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात, तर काहींना घरीच उपचार चालू आहेत.
शासकीय रुग्णालयातील स्वच्छता कामगार सुमन मोघे या प्रतिदिन ‘घर ते रुग्णालय आणि रुग्णालय ते घर’, असे १० कि.मी.चे अंतर पायी सर करतात. या रुग्णालयात गेल्या ५ वर्षांपासून त्या काम करत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. प्रशासनाकडून लागू केलेल्या कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
विनीत रुग्णालयाचे संचालक डॉ. विद्याधर पंढरीनाथ सूर्यवंशी यांच्या विरोधात आयुर्वेदाची पदवी असतांना अॅलोपॅथीची पदवी असल्याचे लिहून रुग्णांची दिशाभूल केल्याच्या प्रकरणी महापालिकेच्या वतीने फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या महामारीच्या काळात मन स्थिर आणि सकारात्मक ठेवण्यासाठी साधना करण्याविना पर्याय नाही. साधनेमुळेच मन स्थिर आणि खंबीर राहू शकते !
येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५२९ कोटी ३६ लाख ५५ सहस्र २६ रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित यांच्यासह १९ संचालक अन् मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उत्तरदायी धरले आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने जिल्ह्यात २० मेपासून निर्बंधांत शिथिलता आणली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रामामूर्ती यांनी दिली.