देशाला विनाशाकडे घेऊन जाणारे व्यक्तिस्वातंत्र्यवाले !

‘व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे न समजणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले देशाला विनाशाकडे नेत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेत सर्वस्वाचा त्याग टप्प्याटप्प्याने करावा !

‘साधनेत आरंभीच सर्वस्वाचा, म्हणजेच तन, मन आणि धन यांचा १०० टक्के त्याग करता येत नाही. यासाठी त्यांपैकी एकेकाचा थोडा थोडा त्याग करावा, उदा. सेवा आणि नामजप यांचा कालावधी दर महिन्याला थोडा थोडा वाढवणे..

गुढीपाडव्यापासून व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात रामराज्य स्थापन करण्याचा संकल्प करा !

‘गुढीपाडवा अर्थात् युगादी तिथी, म्हणजे हिंदूंचा नूतन वर्षारंभदिन ! हिंदु धर्मात साडेतीन मुहूर्तांवर शुभ कृत्ये करण्याचा संकल्प केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आता देशाला आवश्यकता आहे ती रामराज्याची ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार जाणा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रत्येक गोष्टीचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची) सुतारापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

असे असतात हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘जन्मांधाने ‘दृष्टी, दिसणे असे काही आहे’, असे मानणे ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणावे, तसे बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म दृष्टी असे काही आहे’, असे मानणे, ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद नसल्याचा लाभ !

‘आद्य शंकराचार्य आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या वेळी बुद्धीप्रामाण्यवादी नव्हते, हे बरे. नाहीतर त्यांनी मुलांना घरदार सोडून आश्रमात जायला साधना करायला विरोध केला असता आणि जग त्यांच्या अप्रतिम ज्ञानाला कायमचे मुकले असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अत्यंत दयनीय झालेली हिंदूंची स्थिती !

‘धर्मशिक्षणाच्या अभावी आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी निर्माण केलेल्या विकल्पांमुळे हिंदूंना हिंदु धर्माचे अद्वितीयत्व ज्ञात नसल्यामुळे त्यांना धर्माभिमान नाही; म्हणून त्यांची स्थिती जगातील सर्वधर्मियांत अत्यंत दयनीय झाली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रद्धाहीन आणि बुद्धीवादी समाजाला विज्ञानाच्या आधारेच अध्यात्म पटवून द्यावे लागते !

‘पूर्वीच्या काळी ‘शब्दप्रमाण’ असल्यामुळे सर्वांची ऋषी-मुनी आणि गुरु यांनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा असायची. आता त्यांच्यावर श्रद्धा न ठेवता विज्ञानावर ठेवत असल्यामुळे ‘सनातन संस्था’ आणि ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ यांना वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे सहस्रो प्रयोग करून अध्यात्म सिद्ध करावे लागत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे अद्वितीयत्व लक्षात घ्या !

‘विज्ञानासारखे बुद्धीगम्य शिक्षण ‘जीवन सुखाने कसे जगायचे’, हे शिकवण्याचा प्रयत्न करते, तर अध्यात्म ‘जीवन आनंदाने कसे जगायचे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कसे सुटायचे’, हे शिकवते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले