साधनेविना जीवन पशुतुल्य !
‘साधना न करणारे मानव प्राण्यांप्रमाणे आहेत. प्राण्यांना शरीर असूनही ते साधना करत नाहीत, तसेच बहुसंख्य मानव शरीर असूनही साधना करत नाहीत !’
‘साधना न करणारे मानव प्राण्यांप्रमाणे आहेत. प्राण्यांना शरीर असूनही ते साधना करत नाहीत, तसेच बहुसंख्य मानव शरीर असूनही साधना करत नाहीत !’
‘मतदारांनो, तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराने केलेल्या चुकांसाठी तुम्हीच उत्तरदायी असणार आहात. त्यामुळे त्या चुकांचे पाप तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा !’
‘आपल्या आई-वडिलांनी किंवा शिक्षकांनी लहानपणी मुलांना अ, आ, इ… हे शिकवले नसते, तर मुलांना पुढे शिकता आले नसते. त्याप्रमाणे अध्यात्मात गुरु आपल्याला जे शिकवतात, ते पुढे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे असते.’
‘आधुनिक विज्ञानाच्या उत्पत्तीपूर्वीच हिंदु धर्मग्रंथ हे प्रगतावस्थेत होते. हल्ली विज्ञानाने जे शोध लावले, त्यांचा शोध आपल्या ऋषी-मुनींनी सहस्रो वर्षांपूर्वीच लावला होता. त्यांचा उल्लेख वेद, उपनिषदे, पुराणे यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये केलेला आहे. या ग्रंथांमध्ये अजूनही अनेक वैज्ञानिक सूत्रे सांगितलेली आहेत, की ज्यांच्यापर्यंत आधुनिक विज्ञानाला पोचता आलेले नाही.’
विज्ञानाने स्वार्थीपणा वाढू शकतो, तर अध्यात्मात साधनेने स्वार्थीपणा नाहीसा होतो.
वैज्ञानिक स्थुलातील गोष्टींचे संशोधन करतात, तर संत सूक्ष्मातील गोष्टी जाणतात आणि काही प्रसंगी त्यावर अधिकारही मिळवतात.
‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो. एवढेच नव्हे, तर वर्षातूनही काही दिवस हक्काने सुट्टी घेतो. असे असतांना यासंदर्भात माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?’
‘साधनेसंदर्भात काही जण नुसते प्रश्न विचारत असतात, कृती काहीच करत नाहीत. त्यांनी लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन यांचे पुढील सुवचन लक्षात ठेवून साधना करावी. ‘का आणि कसे ?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारत बसू नका, तर कार्यात स्वतःला झोकून द्या आणि वेळप्रसंगी सर्वस्वही अर्पण करा !’ – लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन (Ours is not to reason why, ours is but to do and die. – Lord Alfred Tennyson)’
‘भारत स्वतंत्र झाल्यानंतर ७० वर्षांत काँग्रेसने निवळ हिंदुद्वेष आणि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले. भारताला आणि हिंदु धर्माला नष्ट करण्यासाठी साम, दाम, दंड अन् भेद अशा सर्व नीतींचा वापर केला. काळानुरूप हिंदूंनी एकजुटीने काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणले. यावरून हिंदूंनो, आपल्या एकीचे बळ जाणा ! केवळ सत्तापालटापुरते नाही, तर ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, याचाही बोध घ्या !’
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत. त्यांतील एकतरी गोष्ट शास्त्रज्ञांना बनवता आली आहे का ?’